आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, आणि त्यातील काहींनी तर या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. हिंदीतल्या या मराठमोळ्या चेह-यांच्या यादीत रीना वळसंगकर – अग्रवाल हिचादेखील समावेश होतो. हिंदीचा छोटा आणि मोठ्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी रीना आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चांगल्या भूमिका वठवत आहे. रीनाची खासियत म्हणजे, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही क्षेत्रात तिने अभिनयाचा वेल बॅलेंस साधला आहे. ‘अजिंठा’ या मराठी सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रीनाने हिंदी सिनेसृष्टीतला आपला करिअरचा ग्राफ चढता उंचावला आहेच, पण त्यासोबतच ती मराठी सिनेसृष्टीलादेखील तेवढेच प्राधान्य दिले आहे. सध्या रीना ‘एजंट राघव’ या मालिकेत डॉ. आरती मेस्त्रीची भूमिका साकारीत आहे. रीनाची अजून एक वेगळी ओळख सांगायची म्हणजे “तलाश” या हिंदी सिनेमात तिने आमिर खान सोबत काम केले आहे. यात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. रीनाचे व्यक्तिमत्व देखील असेच डॅशिंग असल्यामुळे तिने साकारलेल्या इन्स्पेक्टर सविताच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली. अशाप्रकारे मराठीतील ‘अजिंठा’ आणि हिंदीतील ‘तलाश’ या दोन महत्वाच्या सिनेमांमुळे तिच्या करिअरचा आलेख चांगलाच वाढला. अभिनेत्री म्हणून करिअर करण्यापूर्वी रीना ने एका खाजगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम केले होते. आपण पुढे जाऊन अभिनेत्री बनू असा स्वप्नातही विचार न केलेल्या रीनाला तिच्या नृत्यकलेने अभिनय क्षेत्रात आणले. दिसायला सुंदर असणा-या रीनाचे हे नृत्यकौशल्य नितीन देसाई यांनी उत्तमरित्या हेरले. त्यांच्या ‘अजिंठा’ या सिनेमातील ‘कमला’ या सेकंड लीड भूमिकेसाठी रीनाची निवड करण्यात आली. रीनाने ‘माझी बायको माझी मेहुणी’ या मराठी नाटकात अविनाश खर्शीकर यांच्यासोबत काम केले आहे. सध्या रीना ‘एजंट राघव’ या मालिकेसोबतच अनुप जलोटा आणि संजना ठाकूर यांच्या ”कृष्णप्रिया’ या संगीतनाटकात ‘उदा बाई’ आणि ‘राधा’ ची भूमिका करीत आहे.
M – Town diva Sai Tamhankar has a fetish for branded eyewear
One of the most beautiful and glamorous actresses, Sai Tamhankar has set a benchmark in the Marathi film industry by her splendid performances. Having won several awards for her astonishing performance and stunning looks, Sai is the first Marathi actress who got featured on the cover page of Femina Magazine not only once but twice. Apart from her acting skills, the M- town diva does not disappoint her fans when it comes to fashion. The dazzling beauty experiments with her looks every time and look nothing less than ‘wow’.
Sai has a perfect sense of fashion. She has got the taste for particular brands as she is a brand conscious chic. Sai has a fetish for branded eyewear and never steps out without them. Her style statements are incomplete without eyewear. She considers them to be her most important accessory. Once she has decided on her outfit, her next part of dressing up is to find the shades to match. It comes as no surprise that she has a huge collection of branded eyewear. She owns almost 50 pairs! In fact she collects them and maintains a separate wardrobe only for her sunnies. Sai has always worn the latest brands and styles in eyewear.
Sai is often seen posting pictures with stylish eyewear on her Instagram account for her followers. Pictures of actress proves that she is absolutely in love with eyewear. Ever since she has grabbed the limelight, she hasn’t disenchanted her fans even once with her style choices and there’s no second thought that she will keep charming everyone with her charismatic personality.
Bollywood has a very long history. Over a period of more than 100 years Indian cinema has given many timeless and classic films. As Bollywood has influence on people of India so many actors are worshiped like god by their fans. With Marathi films doing well, and competing Bollywood movies, the fan base of Marathi celebrities is also increasing extensively day by day. Success story of any star has a lot to owe to their devoted admirers.
The very talented and gorgeous M – Town diva Sai Tamhankar has always charmed everyone with hercharismatic personality and brilliant performances in Marathi movies. The versatile actress Sai has a huge fan following across India, but this is about her crazy fan Vicky Rathod who has always done something extraordinary to make her feel stupendously special. Vicky Rathod is unstoppable when he is out to display his innermost feelings for his favourite M- Town icon ‘Sai Tamhankar’. The fan admires Sai to such an extent that he has tattooed her name on his wrist. He also has twitter handle ‘Oh My Saishine’, from where he keeps tweeting only for Sai. The crazy fan frantically follows the actress wherever she goes and be able to attend all her events.
After all his efforts to impress the star, M – Town diva Sai finally decided to meet her crazy fan.Recently Sai celebrated her biggest fan’s birthday with all her heart, making his special day memorable. Sai specially planned a birthday surprise for her fan Vicky wherein she put up a treasure hunt setup and after guessing the last clue correctly hegot an opportunity to meet his Dream Girl Sai.Sai is always highly considerate of the affection by her die-hardfans. Vicky will always cherish the surprise given by his SaiShine.
– यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष ; २ ते १० जानेवारीदरम्यान प्राथमिक फेरी
– एकूण तीन लाख रुपयांची पारितोषिके
– भरत जाधव स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर
तरुणाईच्या सर्जनशील नाट्यकृतींची सकस स्पर्धा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेत रंगणार आहे. राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार आहे.
श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. अभिनेता भरत जाधव या स्पर्धेचे ‘ब्रँड अँबेसिडर’ आहेत.
स्पर्धेचे आयोजक व तरूण उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी स्पर्धेविषयी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समन्वयक स्वप्नील मुनोत या वेळी उपस्थित होते.
अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, कोकण आणि औरंगाबाद या केंद्रांवर प्राथमिक फेरी २ ते १० जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यातील दर्जेदार २५ संघांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात येणार आहे. माझे मन तुझे झाले फेम हरीश दुधाडे आणि लेखक दिग्दर्शक अभिजित दळवी प्राथमिक फेरीचे परीक्षण करणार आहेत. अंतिम फेरी नगर येथील माऊली सभागृहात २१ ते २४ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची पारितोषिके असून, सर्वोत्कृष्ट एकांकिकेला ६१ हजार १११ रुपये आणि महाकरंडक प्रदान करण्यात येणार आहे.
‘एकांकिका स्पर्धांच्या विश्वामध्ये अहमदनगर महाकरंडक स्पर्धेने वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे. दरवर्षी या स्पर्धेच्या प्रतिसादात वाढ होत आहे. उत्तम व्यवस्थापन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. अंतिम फेरीतील सर्व संघाच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे स्पर्धकांना पूर्ण स्पर्धेचा आनंद घेता येतो. ६१ हजार १११ रुपये एवढे मोठे पारितोषिक देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेने शहरी आणि ग्रामीण भागातील एकांकिका एका मंचावर आणले आहे. तसेच ग्रामीण भागातील नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी ही स्पर्धा पूरक ठरत आहे,’ असे फिरोदिया यांनी सांगितले.
‘चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक मान्यवर अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात. त्यामुळे गुणवान कलाकारांना चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये काम मिळण्याची संधी निर्माण होते. शिवराज वायचळ, रूतुजा बागवे अशा काही कलाकारांना याच स्पर्धेतून त्यांची चंदेरी दुनियेतील वाटचाल सुरू केली,’ असेही फिरोदिया यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज ५ डिसेंबरपासून उपलब्ध होणार असून, नोंदणीसाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. प्रवेश अर्ज www.mahakarandak.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
प्रेक्षकांना सहज आपलंसं करणारं आणि त्यांची अचूक नसओळखणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक रवि जाधव आपल्या चांगलंचपरीचयाचं आहे. त्यांची प्रस्तुती असलेल्या आगामी ‘ & जरा हटके’ या सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आजच्या मॉडर्न जगातनात्यामध्ये बदलत चाललेली भावनिकता आणि त्यातून दोनजनरेशनमध्ये घातलेली सांगड या सिनेमात जरा हटके पद्धतीनेमांडली आहे. ‘&’ हे अक्षर मुळात दोन भिन्न गोष्टी जोडणारे असूननात्यांना कम्प्लीटनेस मिळवून देणारे आहे. तोच कम्प्लीटनेस हासिनेमा पाहताना प्रेक्षक नक्कीच अनुभवतील. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नव्या युगातील वेगाने बदलतअसलेल्या नात्यांतील गुंतागुंत जरा हटके पद्धतीने सादर करण्याचाआम्ही प्रयत्न केला आहे. नुकताच या सिनेमाचा लोगो अनेकमान्यवरांनी ट्विट करुन तो अतिशय वेगळा व नाविन्यपुर्ण असल्याचीपोच पावती दिल्याची माहिती रवि जाधव यांनी दिली. इरॉसइंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेल्या ‘ & जराहटके’ या सिनेमाचे लेखन मिताली जोशीने केले असून दिग्दर्शनप्रकाश कुंटे यांनी केल आहे.
एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेला ‘वृंदावन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
भरपूर एंटरटेनमेंट असलेला ‘वृंदावन’ हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला, ड्रामा आणि अॅक्शनने परिपूर्ण असा हा सिनेमा असून, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा अशी प्रदर्शनापूर्वीच ‘वृंदावन’ या सिनेमाने ओळख बनवली आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरच्या केलिग्राफीवर मोरपीस दाखवल्यामुळे हा पोस्टर पाहताच क्षणी लोकांना भूलवतो. शिवाय ‘वृंदावन’च्या सगळ्यात मह्गड्या अशा आयुष रिसोर्टचे भव्य लोकेशन देखील या पोस्टरवर दिसून येईल. अशाप्रकारे, दिग्गज कलावंतांच्या मांदियाळीत उभे राहिलेले ‘वृंदावन’ चे हे पोस्टर असून, ते या सिनेमाचे प्रातिनिधिक स्वरूप दाखवते.
या सिनेमातील जमेची बाजू म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळणार आहे. धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स, कानाला सुमधुर वाटणारी गाणी आणि दिग्गजांचा अनुभव या सिनेमात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शिवाय, राकेश बापट हा हिंदी मालिकांमध्ये दिसणारा चॉकलेट हिरो या सिनेमात धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स करताना दिसेल. राकेशसोबतच पूजा सावंत तसचं वैदेही परसूरामी ही मुख्य भूमिकेत असणार आहेत. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे महेश मांजरेकर, अशोक सराफ, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर , भारत गणेशपुरे, या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला असा हा सिनेमा असणार आहे. आतापर्यंत रिजनल भाषेत काम करणारे टीलव्ही प्रसाद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे भव्य मनोरंजन करेल यात शंका नाही. राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर या तिघांनी मिळून ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली तर अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे सहनिर्माते आहेत.जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत. हिंदी सृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारे गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. एकंदरीतच एंटरटेनमेंटचा मालमसाला असलेला हा चित्रपट नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रात्रीचे आठ वाजले की घराघरात वाजणारी ‘रोज रोज कसरत..’ ची धून आता बंद होणार आहे. श्री-जान्हवी यांची गाजलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ येत्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं वृत्त आहे.
15 जुलै 2013 ला प्रक्षेपित झालेल्या पहिल्या भागापासून ‘होणार..’ ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. नायक, नायिका आणि तिच्या सहा सासवा अशी आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेल्या झी मराठी वाहिनीला ‘होणार’ने टीआरपीचे आकडे वर ठेवण्यास साथ दिली.
चटपटीत संवाद, उत्कंठा वाढवणारं कथानक, सर्वच कलाकारांचा सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांना मालिकेने आपलंसं केलं. मालिकेने नुकताच 750 भागांचा टप्पाही पार केला होता. झी मराठी अवॉर्डमध्ये अनेक पुरस्कार पटकावत प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही मालिकेने मिळवली.
मध्यंतरीच्या काळात मालिकेला उतरती कळा लागली. जान्हवीचं बाळंतपण, नऊ महिन्यांपासून अधिक काळ लांबलेली तिची डिलीव्हरी यामुळे सोशल मीडियावरुन तिची खिल्ली उडवली जात होती. जान्हवीचा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग तर चांगलाच गाजला. त्यावरुन आलेले विनोद, उखाणे यांनी मालिकेइतकीच प्रेक्षकांची करमणूक केली.
झी मराठीवरील का रे दुरावे, जय मल्हार, चला हवा येऊ द्या सारख्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर कब्जा मिळवला आहे. शिवाय नव्याने दाखल झालेल्या नांदा सौख्यभरे, माझे पती सौभाग्यवती मालिकाही प्रेक्षकांना आवडू लागल्या आहेत. त्या तुलनेने ‘होणार सून’ मागे पडल्याचं म्हटलं जातं. कोणती नवीन मालिका श्री-जान्हवीची जागा घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
श्री आणि जान्हवी यांची व्यक्तिरेखा साकारणारे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान मालिका सुरु झाल्यानंतर गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दोघं विभक्त होणार असल्याचंही वृत्त आलं.
गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री अशी विशेषणं ऐकली की उर्मिला कानिटकर- कोठारे हिचं नाव चटकन तोंडी आल्या शिवाय रहात नाही. दुनियादारी सिनेमात साकारलेली मिनू काहीशी तशीच होती. मात्र प्यारवाली लव्ह स्टोरीने तिच्या चाहत्यांना जोरदार झटकाच दिला. तुफान, टॉमबॉईश नंदिनीने प्रेक्षकांची झोपचं उडवली. आता तर उर्मिला आपल्याला भन्नाट रुपात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल निर्मिती असलेला ‘गुरु’ सिनेमा २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव करत असून या चित्रपटात उर्मिलाचा नुसताच वेगळा रोल नाहीये तर तिचा हटके मेक ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरीच्या ‘सनग्लासेस’ च्या स्टाईलची जशी सगळीकडे चर्चा आहे तशीच उर्मिला तिच्या जबरदस्त लुकमुळे रॉकऑन झालीये. तिने ‘गुरु’ सिनेमात साकारलेली ‘मँगो डॉली’ तिच्या चाहत्यांनी यापूर्वी नक्कीच पहिली नसेल. ‘गुरु’ मधील तिचा रावडी लुक तिने आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी चाकोरी बाहेरचा असेल यात शंका नाही. तिच्या तोंडी असलेले गावरान संवाद, भडक रंगाच्या घागरा चोळीचा पेहराव आणि एकंदरच तिने वठवलेली भूमिका पाहून वाह ‘गुरु’ म्हणतच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतील. म्हणण्याची मध्ये तिची चौकटीच्या बाहेर भूमिका असणार आहे.
महत्त्वाकांक्षेच्या धर्तीवर फुलणारं प्रेम शासन सिनेमात
भारतीय राजकारणावर नेमके पद्धतीने भाष्य करणारा शासन सिनेमा प्रेम, महत्वाकांक्षा या भावनां देखील मार्मिकरित्या मांडल्या आहेत. या सिनेमात प्रेम आणि महत्त्वाकांक्षेच्या भावविश्वाची नाजूक गुंफण पाहायला मिळणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री मनवा नाईक यांचे हळुवार फुलत जाणारे ‘प्रेम’ शासन मध्ये पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने हि दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील. राजकारणात येण्याचे स्वप्न बाळगणा-या तरुण युवकाची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली असून मनवा नाईकने सिनेमात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका कंपनीच्या कामगार संघटनेचा प्रमुख असणा-या जितेंद्रची आणि मनवामध्ये खुलणारे प्रेम आणि वेळेनुरूप त्याचे बदलणारे महत्व सिनेमात अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहे. प्रेम आणि महत्वाकांक्षा याच्यातील यात नेमकं काय जिंकतं हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना १५ जानेवारी पर्यंतची वाट हवी लागणार आहे. श्रेया फिल्म्सचे निर्माते शेखर पाठक यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला शासन सिनेमा सामान्य माणसाच्या राजकारणातील मानसिकतेचा वेध घेतला आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.