स्वानंदीचं म्हणणं आहे “माणसं खरी असली, की नात्यात खोटं येत नाही”. ‘नांदा सौख्य भरे’ ही गोष्ट आहे स्वानंदीची, ती मनापासून खूप खरी आणि खोट्याचा तिरस्कार करणारी मुलगी आहे. स्वानंदीचा नवरा इंद्रनील हा अमेरिकेवरून परत आलेला असतो. ही कथा आहे स्वानंदी आणि तिची सासू, ललिताची. स्वानंदी सत्याच्या आधाराने घरातील अनेक घटनांना सामोरं जाते. गोष्ट तेव्हा खूप मनोरंजक होते जेव्हा स्वानंदी आणि ललिता एकाच घरात एकत्र वावरतात आणि त्यांचे एकदम विरोधी विचार सामोरासमोर येतात.
कार्यक्रमाची वेळ : २० जुलैपासून, सोम ते शनि. संध्या. ७.३० वाजता